Wednesday, 23 July 2014

● वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ●

● वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ●

आवश्यक कागदपत्रे
१) विहीत नमुन्यातील अर्ज
२) अर्जावर ₹१०/- चे कोर्ट फी स्टॅम्प
३) इयत्ता १० वी चे बोर्ड सर्टिफिकेट
४) गावात सलग १५ वर्षे राहत असल्याबाबत ग्रामसेवक अथवा तलाठी यांचा दाखला
किंवा १५ वर्षे महाराष्ट्रातील रहिवास सिद्ध करणारे इतर पुरावे -
उदा.मालमत्ता कर पावत्या/वीज देयके (लाईट बिल)/७/१२ उतारा/मनपाकडील फोटोपास/भाडे पावत्या,भाडे करार (अर्जदार भाडयाने राहत असल्यास घरमालकाचे रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्र येथे केलेले संमतीपत्र सादर करावे व घरमालकाचे नावे असलेली विज देयके सादर करावीत.(यापैकी सन १९८७ पासून २००३ पर्यंत प्रत्येक वर्षाचा एक एक पुरावा सादर करावा.)
५) रहिवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत
६) महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे पालकांचे स्वयं प्रतिज्ञापत्र किंवा सज्ञान अर्जदाराच्या बाबतीत अर्जदाराचे स्वयं प्रतिज्ञापत्र
७) अर्जदार व अर्जदारांचे वडील यांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यामध्ये जन्मस्थळाचे ठिकाण व जन्मतारीख याचा उल्लेख आवश्यक)
किंवा
ग्रामपंचायत अथवा नगरपालिका अथवा महानगरपालिका यांच्याकडील जन्मनोंद वहीचा उतारा किंवा सेवानोंद पुस्तकातील जन्मनोंद असलेल्याची प्रतटिप-
अ) मुळचे महाराष्ट्रीयन इतर राज्यांमध्ये तात्पुरत्या कारणासाठी गेले असतील,तर त्यांच्या स्थावर मिळकतीचे पुरावे सादर करावेत
ब) मुळचे भारतीय परदेशामध्ये तात्पुरत्या कारणासाठी गेले असतील तर पासपोर्टची सत्य प्रत व स्थावर मिळकतीचे पुरावे सादर करावेत
टिपमधील अ) आणि ब) चा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करणे आवश्यक आहे.
क) जर अर्जदार हे परराज्यातील असतील तर वीस वर्षापासुनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा (मालमत्तेचे कार्ड,जमीन असेल तर ७/१२,खरेदी खत,कर पावत्या) सादर करणे आवश्यक
८) विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास
अ) विवाहानंतरचे पुरावे म्हणुन पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचे पुरावे
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात (Gazzette) प्रसिध्द झालेला नावातील बदल किंवा लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला
९) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
वरील नमुद कागदपत्रे घेऊन आपल्या भागातील किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रात जावे.तिथुन विहीत नमुन्यातील अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती अचुक भरुन त्यावर सही करावी.त्या अर्जाला ₹१० चे कोर्ट फी फी स्टॅम्प लावावे.तसेच योग्य त्या किमतीच्या स्टॅम्पवर महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे पालकांचे स्वयं प्रतिज्ञापत्र किंवा सज्ञान अर्जदाराच्या बाबतीत अर्जदाराचे स्वयं प्रतिज्ञापत्र करुन त्याची झेरॉक्स काढुन ते प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन हा अर्ज नागरी सुविधा केंद्रात जमा करावा.
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वाटप केले जाईल.हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यावर तहसीलदार/नायब तहसीलदार यांचा शिक्का व सही झाल्याची खात्री करुन घ्यावी.
====================

No comments:

Post a Comment